Sunday 4 September 2016

नवमहाराष्ट्र युवा अभियान व सम्यक संवाद आयोजित लोकसंवाद .....


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभाग नवमहाराष्ट्र युवा अभियान आणि सम्यक संवाद आयोजित ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत आज महाश्वेतादेवी यांना आदरांजली देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तसेच सूत्रसंचालन सम्यक संवादच्या सोनाली शिंदे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी केले. महाश्वेतादेवी यांच्या जीवनातील संघर्ष व कार्य या विषयावर चर्चा करण्यात आली. ही चर्चा करतांना मा. प्रा. इलीना सेन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महाश्वेतादेवी ह्या फ़क़्त लेखिका किंवा सामाजिक कार्यकर्त्याच नव्हत्या तर त्या एक पत्रकार, साहित्यिक तसेच विचारवंत व आंदोलनधर्मी ही होत्या. इ.स. २००२ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल यांना ऑफिसर ऑफ आर्टस अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला होता. याशिवाय भारतातही त्यांना साहित्य अकादमी ने सन्मानित केले आहे. त्यांना इ.स. १९९६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अश्या त्यांच्या बद्दल ब-याच गोष्टी प्रा. इलीना सेन यांनी त्यांच्या चर्चा सत्रातून मांडल्या. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी त्यांच्या नून या कथेचे वाचन केले. ह्या कार्यक्रमाचे आभार व कविता वाचन श्री. दत्ता बाळसराफ यांनी केले व कार्यक्रमाची सांगता महाश्वेतादेवी यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘ हजार चौरासी कि मॉ’ च्या फिल्म स्क्रीनिंग ने झाले. या कार्यक्रमासाठी श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद होता. या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सरचिटणीस श्री. शरद काळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी सावंत, प्रा. महेश कांबळे, पत्रकार समीर परांजपे, नीला उपाध्ये, श्री. सचदेव, शंकर खरात, भारती शर्मा, हेमांगी जोशी, संगीता मालशे, संगीता खरात,. सम्यक संवादचे निलेश खानविलकर, तसेच तसेच इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment