Tuesday 4 April 2017

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे दि. १५ व १६ एप्रिल २०१७ रोजी औरंगाबाद येथे आयोजन दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन, संमेलनस्थळी राज्यातील शिक्षक साहित्यिकांची मांदियाळी



औरंगाबाद विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबाद, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शिक्षक साहित्यिक बालाजी मदन इंगळे (उमरगा, जि. उस्मानाबाद ) यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे संमेलनाच्या निमंत्रक असून या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी मराठवाडा शिक्षक मतदासंघाचे आ. विक्रम काळे यांची निवड संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. औरंगाबाद येथे शनिवार, दि. १५ व रविवार दि १६ एप्रिल २०१७ रोजी सदरील संमेलन कै. वसंतराव काळे स्मृती साहित्यनगरी, रुख्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हन हिल्स, औरंगाबाद या ठिकाणी संपन्न होईल. राज्यभरातील दिड हजाराहून अधिक साहित्यप्रेमी शिक्षक या संमेलनात सहभागी होणार आहेत.

अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांवर, शैक्षणिक विषयांवर लिहिणारे ( शिक्षणातील नवीन प्रवाह, शैक्षणिक समस्या, इत्यादी ) आणि ललित साहित्य (कथा, कविता, नाटक, कादंब-या इत्यादी ) अशा तिन्ही अंगांनी लेखन करणारे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरांवर काम करणारे अनेक शिक्षक महाराष्ट्रात आहेत. अशा शिक्षकांना एकत्र येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाण-घेवाण करता यावी, अशा लिहित्या शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख मिळावी व त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी, हा या संमेलन आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे. यापुर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद ) आणि शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ साली पुण्यात पहिले राज्यस्तरीय शिक्षकांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले होते. याचबरोबर वाचन संस्कृती वाढावी व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठीही हे संमेलन निश्चितच दिशादर्शक ठरेल. पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनात केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचाच सहभाग घेण्यात आला होता. यावेळी उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन दुस-या शिक्षक साहित्य संमेलनात त्यांनासुद्धा सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन दिवसीय  संमेलनात विविध परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवीसंमेलन, कथाकथानासह सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहेत. शनिवार, दि. १५ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ९ वा. संत तुकाराम नाट्यगृह, सिडको ते रुक्मिणी सभागृह, एम.जी.एम. परिसर या मार्गार ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसह राज्यातील नामवंत शिक्षक साहित्यिक या ग्रंथदिंडीत सहभागी होतील. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील प्रमुख प्रकाशकांचा समावेश असलेल्या 'वि.स.खांडेकर ग्रंथनगरी' या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

रुक्मिणी सभागृहातील 'सावित्रीबाई फुले विचारमंचा'वर संमेलनाचा उद्घाटन सोहळा सकाळी १० वा. संपन्न होईल. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती मा. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष मा. बालाजी मदन इंगळे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मा. बाबा भांड, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष मा. आ. हेमंत टकले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. आ. विक्रम काळे, ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा. रां. रं. बोराडे, विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. नंदकिशोर कागलीवाल, एम.जी.एम. चे विश्वस्त मा. अंकुशराव कदम, मा. सचिन मुळे, संयोजक मा. डॉ. वसंत काळपांडे, मा. बसंती रॉय, मा. दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी राज्यातील शिक्षक साहित्यिकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. शिक्षण विकास मंचच्या वतीने दरवर्षी देण्यात येणा-या 'कुमूद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कारांचे' देखील वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १.३० वा. राज्यातील प्रसिद्ध शिक्षक साहित्यिकांची 'माझ्या लेखन प्रेरणा' हि प्रकट मुलाखत घेण्यात येईल. निशाणी डावा अंगठाकार प्रसिद्ध साहित्यिक मा. रमेश इंगळे उत्रादकर (बुलडाणा), प्रसिद्ध साहित्यिक मा. कृष्णात खोत (कोल्हापूर ), प्रसिद्ध साहित्यिक मा. प्रविण बांदेकर (सिंधुदुर्ग ), प्रसिद्ध साहित्यिक मा. संजीवनी तडेगावंकर या नामवंत शिक्षक साहित्यिकांच्या मुलाखती मा. केशव खटिंग (परभणी) व मा. संदीप जगदाळे ( औरंगाबाद) हे घेतील.

यानंतर दुपारी तीन वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले असून 'शिक्षकांचे सोशल मिडीयावरील सृजनशील लेखन' या विषयावरील परिसंवाद संपन्न होईल. या सत्राच्या अध्यक्षा मा. प्रज्ञा देशपांडे (नागपूर) या असतील तर मा. अनिल सोनुने (जालना), मा. वृषाली विनायक (मुंबई ), मा. भाऊसाहेब चासकर (अहमदनगर) हे शिक्षक प्रतिनिधी या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. रुपेश मोरे (औरंगाबाद) हे या सत्राचे संचालन करतील.
या सत्राबरोबरच आईन्स्टाईन हॉल येथे दुपारी तीन वाजता 'कवी कट्टा' या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून, राज्यभरातून आलेल्या शिक्षक कवींना या कट्ट्यावर आपल्या कविता सादर करता येतील.
सायंकाळी पाच वाजता निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे आयोजन आलेले असून, प्रसिद्ध कवी मा. अशोक कोतवाल ( जळगाव ) हे या सत्राचे अध्यक्ष असतील, मा. चंद्रशेखर मलकमपट्टे (लातूर) व मा. भारत सातपुते (लातूर ) हे कवी संमेलनाचे संचालन करतील. मा. अरुण पवार ( बीड) मा. गोविंद पाटील (कोल्हापूर ), मा शब्बीर शेख (औरंगाबाद), मा. सतिष दराडे (अकोला), मा. कविता नरवडे ( जालना), मा. स्वाती शिंदे पवार (सातारा), मा. अनिल साबळे (पुणे), मा. आशा पैठणे, मा. सुनंदा कांबळे ( सिंधुदूर्ग ), मा. कैलास दौंड ( अहमदनगर), मा. कविता मोरवणकर (मुंबई), मा. राजेंद्र दिघे (नाशिक), मा. मनिषा घेवडे (मुंबई), मा. जिजा शिंदे (औरंगाबाद), मा सलील सिद्धीकी (लातूर), मा. अप्पा जगताप (हिंगोली), मा. लतिका चौधरी (धुळे ), मा. तृप्ती अंधारे (उस्मानाबाद), मा. माधव सुर्यवंशी (मुंबई ), मा. इंद्रजित घुले (सोलापूर), रविंद्र मालूंजकर (नाशिक), मा. बालाजी फड (धुळे), मा. लता गुठ्ठे (मुंबई), मा. शिवदास पोटे (हिंगोली), मा. सुरेश हिवाळे (परभणी), मा. प्रमोद माने (उस्मानाबाद ) मा. बी.एन. चौधरी (जळगाव), मा. मैत्रेयी केळकर (मुंबई ), मा. अशोक कोळी ( जळगाव), मा. मोहन कुंभार (सिंधुदुर्ग ) मा. शेषराव धांडे (वाशिम), मा. हरीष हातवटे (बीड), मा. सारिका उबाळे (अमरावती) हे सहभागी होतील. रात्री साडे आठ वाजता प्रा. अशोक जोंधळे निर्मिती 'खान्देशचा मळा, मराठवाड्याचा गळा' हा काव्यसंगीतावर आधारित सुप्रिसद्ध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.

संमेलनाच्या दुस-या दिवशी दि. १६ एप्रिल २०१७ रोजी सकाळी नऊ वाजता कथाकथन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. नामवंत शिक्षक कथाकार या सत्रात आपला सहभाग नोंदवतील. मा. एकनाथ आव्हाड (मुंबई), मा. बाबासाहेब परीट (सोलापूर) मा. संभाजी आंधळे (धुळे), मा. अनिता येलमटे (लातूर) हे आपल्या कथा या सत्रात सादर करतील. मा. बबन माळी (औरंगाबाद ) हे या सत्राचे संचालन करतील.

सकाळी साडे दहा वाजता 'पाठ्यक्रमातील साहित्याची निवड व निकष' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मा. श्रृती चौधरी (पुणे) या सत्राच्या अध्यक्षा असतील तर मा. गजानन पळसुळे देसाई (रत्नागिरी), मा. विठ्ठल भुसारे (परभणी) व मा. सोमनाथ वाळके (बीड) हे मान्यवर या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. विनोद सिनकर (औरंगाबाद) हे या सत्राचे संचालन करतील.

दुपारी बारा वाजता 'वाचन संस्कृतीशी मुलांना जोडण्यासाठी शिक्षकांची भुमिका' या विषयावरील परिसंवाद संपन्न होईल. मा. नरेंद्र लांजेवार (बुलडाणा) हे या सत्राचे अध्यक्ष असतील. मा. शिवाजी अंबुलगेकर (नांदेड), अरविंद शिंगाडे (बुलडाणा) व फारुख काझी (सोलापूर) हे मान्यवर या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. दयानंद कांबळे हे या सत्राचे संचालन करतील.

दुपारी तीन वाजता या संमेलनाचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध साहित्यिक मा. रंगनाथ पठारे हे या समारोप सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शन करतील. यावेळी संमेलनाध्यक्ष मा. बालाजी मदन इंगळे, स्वागताध्यक्ष मा. आ. विक्रम काळे, स. भु. शिक्षण संस्थेचे सहचिटणीस मा. डॉ. श्रीरंग देशपांडे, एम.जी.एम.चे विश्वस्त मा. प्राचार्य प्रताप बोराडे, डॉ. अपर्णा कक्कड यांची प्रमुख उपस्थिती असेल.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकवणा-या आणि ललित किंवा शैक्षणिक विषयावर लेखन करणा-या शिक्षकांना या संमेलनात सहभागी होता येईल. नाममात्र प्रतिनिधी शुल्कात निवास, भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या शिक्षकांना या संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी shikshaksahitva@gmail.com या मेल आयडीवर अथवा अभ्युदय फाऊंडेशन, कासलीवाल सुवर्णयोग, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड, गारखेडा परिसर, औरंगाबाद - ४३१००५ (दूरध्वनी क्र. ०२४०-२३५१७७९ ) येथे संपर्क साधावा.

संमेलनात सर्व साहित्यप्रेमी व शिक्षक साहित्यिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, संमेलनाचे कार्यवाह नीलेश राऊत, आयोजन समितीचे विजय कान्हेकर, डॉ. दासू वैद्य, डॉ. कैलाश अंभुरे, डॉ. वीर राठोड, सौ. शुभांगी काळे, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. महेश अचिंतलवार, सुबोध जाधव, दिलीप सुर्यवंशी, रुपेश मोरे, विनोद सिनकर, राजेंद्र वाळके, गणेश घुले, एच.बी. सोमवंशी, बबन माळी, धर्मराज शिंदे, पी.जी. राजपूर, पी.जी. डोणगावे, एन.सी. कवडे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment