Monday 13 November 2017

एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विकास अध्ययन केंद्र, कोरो, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर राज्यस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यभरातून महिला वर्ग उपस्थित होता. विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी हजर असलेल्या तृतीयपंथी यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे आणि कार्यक्रम व्यवस्थापक दत्ताबाळ सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.








मराठवाड्यात २०१५ व २०१६ या दोन वर्षांमध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'एकल महिला व पाणिप्रश्न' या विषयावर संशोधन अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने औरंगाबाद येथे ९ सप्टेंबर २०१७ रोजी 'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर विभागीय चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमात झालेल्या सर्व चर्चेतून एक समान सूर समोर आला तो म्हणजे एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आखणी' करणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्ष विद्या बाळ, सुजाता खांडेकर, फिरोज अश्रफ यांनी उपस्थितांना वेगवेगळ्या उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
शहरी आणि ग्रामीण भागातील एकल महिलांच्या समस्या या विषयावर मा. दीप्ती राऊत यांनी मार्गदर्शन केले. विशेष समाज घटकातील एकल महिलांच्या या विषयावर सुजाता खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुस्लीम समाज्यातील एकल महिलांच्या समस्या मा. जुलेखा आणि तृतीयपंथी यांच्या समस्या माधुरी सरोदे, दिशा शेख यांनी केले.  

No comments:

Post a Comment